भारताकडून पाकच्या एअरबेसवर हल्ला

by Team Satara Today | published on : 12 May 2025


नवी दिल्ली : भारताकडून पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला करण्यात आल्याचा एक सॅटेलाईट फोटो समोर आला आहे. पाकिस्तानच्या भोलारी, नूर खान, जेकोबाबाद आणि सरगोधा एअरबेसवर भारताकडून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, भारताकडून देण्यात आलेल्या चोख प्रत्युत्तराचे सध्या फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

पाकिस्तानच्या चार एअरबेसच्या नुकसानाचे फोटो सध्या समोर आले आहेत. भारताने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईंतर्गत पाकिस्तानच्या तोंडचं चांगलंच पाणी पळालं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने भारताच्या अनेक भागांवर ड्रोन हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. याच हल्ल्यांना दोन दिवसापूर्वी भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यावेळी भारताने पाकचा डाव उधळून लावत पाकच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसवर स्फोट घडवून आणत ते पूर्णतः उद्ध्वस्त केले होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर येत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
पुढील बातमी
मधुरा अन् ओजसने घेतला दोन सुवर्णपदकांचा वेध

संबंधित बातम्या