विजेचा धक्का लागल्याने गुणवरेतील विवाहितेचा दुर्दैवी अंत; घटनेने गावात शोककळा

by Team Satara Today | published on : 25 July 2026


सातारा : फलटण तालुक्यातील गुणवरे येथे गोठ्यात दूध काढण्याचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

प्रियंका तानाजी कर्णे (वय 28) या पती तानाजी कर्णे यांच्यासह गायीचे दूध काढत होत्या. दूध काढण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मशीनला जोडलेल्या दुधाच्या कॅनचे झाकण त्यांनी लोखंडी पाईपला अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अचानक विद्युतप्रवाहाचा धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

पतीने तत्काळ त्यांना विद्युतप्रवाहापासून दूर करून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी तानाजी तात्याबा कर्णे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिली असून, पोलीस नाईक अभंग पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय; विद्यार्थी शक्ती आणि विरोधकांच्या एकजुटीचा यशस्वी लढा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पुढील बातमी
अपघातातील ईश्वरपूरच्या जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; खेड फाटा येथे तोल जाऊन पडल्याने त्यांच्या मेंदूला दुखापत

संबंधित बातम्या