अखेर घटस्फोटावर अभिषेकनं सोडलं मौन ऐश्वर्यासोबतच्या नात्यातील सिक्रेट उघड

by Team Satara Today | published on : 30 June 2025


बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघे बॉलिवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कप्लसपैकी एक आहेत. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री ते त्यांची ऑफ-स्क्रीन रोमान्स पर्यंत ही जोडी कायमच चर्चेत राहिली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कथितपणे त्यांच्यात दुरावा आल्याची आणि ते लवकरच विभक्त होणार आहेत अशा चर्चा सुरु होत्या. त्यांच्याविषयी होणाऱ्या या चर्चां पाहता त्यांच्या चाहत्यांनी अनेकदा चिंता व्यक्त केली. आता या सगळ्या चर्चां असल्या तरी अभिषेक आणि ऐश्वर्या हे शांतच राहत होते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेकनं असं काही सांगितलं ज्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

अभिषेक सध्या त्याचा आगामी चित्रपट 'कालीधर लापता' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्तानं त्यानं नुकतीच ETimes ला मुलाखत दिली होती. या दरम्यान, त्यानं त्याच्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. त्यानं त्याची पत्नी ऐश्वर्याला कसं प्रपोज केलं त्याविषयी सांगितलं आहे. त्यानं सांगितलं की त्यानं 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'गुरु' या चित्रपटाच्या न्यूयॉर्क प्रीमियरनंतर झाला होता. 

अभिषेकनं सांगितलं की हा चित्रपट फक्त त्याच्या करिअरसाठी खास नव्हता तर त्यासोबत त्याच्या खासगी आयुष्यासाठी देखील तितकाच खास होता. अभिषेकनं सांगितलं की 'मी न्यूयॉर्कमध्ये चित्रपटाचं प्रीमियर झाल्यानंतरच तिला प्रपोज केलं होतं. पण माझे सगळे चित्रपट हे खूप पर्सनल असतात आणि मी ते तसेच असावे यासाठी मी प्रयत्न करतो. पण एक-दोन चित्रपट असतील ज्या माझ्या इतक्या जवळच्या नसतील. पण माझा नियम आहे की कोणताही चित्रपट हा प्रायव्हेट असायला हवा. जर त्या माझ्या आवडत नसतील तर शक्यता आहे की मी ते करणार नाही.'

पुढे सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर पसरणाऱ्या अफवांविषयी बोलताना अभिषेकनं हे देखील सांगितलं की 'तो त्याच्या खासगी आयुष्याविषयी सुरु असलेल्या निगेटिव्ह गोष्टींना कशा प्रकारे हाताळतो. जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तो नेहमीच त्याच्या विषयी पसरवण्यात येणाऱ्या या अफवांकडे लक्ष देत नाही. तर त्यानं हे देखील सांगितलं की जे लोक अशा बातम्या पसरवतात, त्यांना कधीच सत्य काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा नसते.' 

अभिषेकनं सांगितलं की आधी या सगळ्या बातम्यांचा त्याच्यावर काही परिणाम व्हायचा नाही, पण आता त्याचं एक कुटुंब आहे जे या सगळ्या अफवांमुळे प्रभावीत होतात. जेव्हा मी कोणत्या गोष्टींना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय होतं? हे सांगत पुढे अभिषेक म्हणाला, 'मी काही स्पष्टीकरण दिलं, तरी लोक त्याला बदलतील कारण निगेटिव्ह बातम्या या विकल्या जातात. तुम्ही किंवा मी नाही. तुम्ही माझं आयुष्य जगत नाही. तुम्ही त्या लोकांना उत्तर देण्यासाठी बांधील नाही आहात. जे लोक अशी नकारात्मका पसरवतात, त्यांना त्यांच्या आत्म्याला हा प्रश्न विचारालायला हवा आणि आपल्या निर्मात्यांना उत्तर द्यावं लागेल. महत्त्वाचं म्हणजे यात फक्त मी एकदा नाही, मुळात मी कोणत्याही गोष्टींनं प्रभावीत होत नाही.'


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पावसाळ्यात चिलट, मुंग्या, माशांचा होतोय त्रास
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील हृदय रुग्णांसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे ठरले आरोग्यदूत

संबंधित बातम्या