सातारा : ग्रंथमहोत्सवात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या वळणावरची माणसं या ग्रंथातील हिराक्का आणि गुलाबबाई या व्यक्तिचित्रांचे अभिवाचन डॉ. अदिती काळमेख, वैदेही कुलकर्णी व चंद्रकांत कांबिरे यांनी केले. अशारितीने सर्वसामान्यातील असामान्य लोकांच्या कथांनी श्रोते भारावले.
सुत्रसंकल्पना व व्यक्तिचित्रामागची भूमिका डॉ. राजेंद्र माने यांनी मांडली. अभिवाचनामध्ये असलेली भावपूर्णता आणि आशय यामुळे श्रोतृवर्ग भारावून गेला.गुलाबबाई या तमासगीर बाईचे व हिराक्का या ग्रामीण स्त्रीचे भावचित्र अभिवाचनातून सादर केले गेले. ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदीप कांबळे यांनी आभार मानले.यावेळी वि.ना.लांडगे, सुनिता कदम,युवराज पवार , पत्रकार अनिल वीर,प्रल्हाद पारटे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व रसिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.