नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारत हल्ला करेल याची पाकिस्तानला भीती वाटत आहे. पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, ५७ देशांची संघटना असलेल्या ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) ने पाकिस्तानला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. अलिकडेच, पाकिस्तानने दक्षिण आशियातील सध्याच्या परिस्थितीबद्दल ओआयसीला माहिती दिली होती, ज्यामध्ये भारताने केलेल्या कृतींना प्रादेशिक शांततेसाठी गंभीर धोका असल्याचे वर्णन केले होते.पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची भूमिका भारताने घेतली आहे. विशेष म्हणजे भारताने हल्ला केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, अशी पोकळ धमकी पाकिस्तानने दिली आहे. दरम्यान, भारताला घेरण्यासाठी पाकिस्तानने मोठा कट रचल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानसोबत इतर चार देश एकत्र आले असून भारताविरोधात डिजिटल युद्ध करण्याचा पाकिस्तानचा डाव समोर आला आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओआयसी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला एकता आणि पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे आणि प्रादेशिक तणावाची मूळ कारणे ओळखून तणाव कमी करण्याचे आवाहन केले. या दरम्यान, जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेषतः उल्लेख करण्यात आला आहे. काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओआयसीच्या ठरावांना पाकिस्तानच्या राजदूतांनी पाठिंबा दिला आहे.न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ओआयसी (इस्लामिक सहकार्य संघटना) राजदूतांच्या बैठकीत पाकिस्तानने दक्षिण आशिया मुद्द्यावर आपले विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने केलेली कारवाई "प्रक्षोभक, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार" होती. त्यांनी ओआयसीच्या सदस्य देशांना भारताच्या या भूमिकेचा आणि त्याच्या संभाव्य परिणामांचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.पाकिस्तानची सध्याची स्थितीपाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी गुरुवारी सुरक्षा परिस्थितीवर चर्चा केली आणि भारताच्या कोणत्याही आक्रमक कृतीला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल असे आश्वासन दिले. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.
भारताविरोधात ५७ देश
मुस्लिम राष्ट्र समूहाने पाकला जाहीर केला पाठिंबा
by Team Satara Today | published on : 02 May 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
तशीच वेळ आली तर इंडिगोच्या सीईओंची हकालपट्टी करणार
December 10, 2025
अखेर स्मृती मानधनाचे पलाश मुच्छलसोबतचे लग्न मोडले; स्वतः केली पोस्ट
December 08, 2025
गोवा : नाईट क्लबमधील अग्नितांडवात २३ जणांचा दुर्दैवी मृत्यू
December 07, 2025
बाबो...! रॅपिडो चालकाच्या खात्यात सापडले ३३१ कोटी
November 29, 2025
तुर्कीमध्ये भूकंपाचे तीव्र झटके
October 28, 2025
बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आल्याने १० जण गंभीर; दोघांचा मृत्यू
October 28, 2025
एक हुशार डॉक्टर भ्रष्ट व्यवस्थेतील गुन्हेगारांच्या छळाचा बळी ठरली
October 26, 2025
आयएनएस विक्रांत अद्वितीय : नरेंद्र मोदी
October 20, 2025
छत्तीसगडमध्ये तब्बल 208 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण
October 18, 2025
गरीब-रथ एक्सप्रेसला भीषण आग
October 18, 2025
एमबीबीएस प्रवेशाचे मोठे रॅकेट आले समोर
October 18, 2025
आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची तक्रार
October 17, 2025