सातारा : जकातवाडी येथील एका तरुणीचा मागील दोन दिवसांपासून संपर्क तुटल्याने तिच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सातारा तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
संबंधित युवती 30 मे रोजी सकाळी घरातून बाहेर गेल्यानंतर परतली नसल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा मिळू शकला नाही.
तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार घोरपडे करीत आहेत.