दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तीव्र विरोधानंतर आता डिपॉझिट न भरताच उपचार

by Team Satara Today | published on : 05 April 2025


पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आणि सोशल मीडियासह सर्व राजकीय मंडळींच्या टीकेचा धनी ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलं आहे. मंगेशकर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी हॉस्पिटलची भूमिका मांडतानाच रुग्णांच्या दृष्टीनं एक सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं कळवले आहे. आजपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एमर्जन्सीमध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतलं जाणार नाही असे पत्र डॉ. केळक यांनी सर्वसामान्यांना लिहिले आहे.

दीनानाथ हाॅस्पिटलमध्ये इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंट आलेला असो वा लहान मुलांच्या विभागातला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही, असा विश्वस्त व मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला असून आज पासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे पत्रात म्हटले आहे. झालेल्या घटनेबद्दल सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी असेही पत्रात म्हटले आहे.

हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ धनंजय केळकर यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत ठेवून वाटचाल करण्यात आली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला रुग्णांकडून अनामत रक्कम घेतली जात नव्हती. पण कालांतराने यात बदल झाला.

कालचा दिवस दिनाच्या इतिहासातील अत्यंत कळावं सुन्न करणारा दिवस होता आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने जनसंपर्क अधिकाऱ्याच्या अंगावर चिल्लर फेकली. महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई-वडिलांच्या हॉस्पिटल वर हल्ला केला व तोडफोड केली. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर या नावाला काळे फासले या सर्व गोष्टी घडल्या हे सर्व बघून आमची मान शरमेने खाली गेली लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांमध्ये मनावर काय परिणाम झाला असेल देव जाणे, असे पत्रात म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
‘एमआयडीसी’ असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे : मुख्यमंत्री फडणवीस
पुढील बातमी
ज्येष्ठ अभिनेते डॉ विलास उजवणे यांचे 62 व्या वर्षी निधन

संबंधित बातम्या