कुऱ्हाडीने हल्लाप्रकरणी मुळीकवाडीचा आरोपी दोषी; न्यायालयाची शिक्षा

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा क्रमांक 349/2017 प्रकरणी न्यायालयाने आरोपी अजित जगन्नाथ बोभाटे (वय 35, रा. मुळीकवाडी, ता. जि. सातारा) याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

प्रकरणात फिर्यादी प्रल्हाद मारुती जगदाळे (वय 64, रा. पंताचा गोठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 23 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी सुमारे 3.45 वाजण्याच्या सुमारास मुळीकवाडी येथील त्यांच्या शेतात केळीचा घड तोडल्याच्या कारणावरून आरोपी अजित जगन्नाथ बोभाटे  याने संतापून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हातातील कुऱ्हाडीने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच डाव्या गालावरही वार केला, मात्र त्यात किरकोळ दुखापत झाली.

या घटनेनंतर आरोपीला दि. 24 ऑगस्ट 2017 रोजी अटक करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलीस फौजदार सी.आर. पाटील यांनी केला होता. या प्रकरणात एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 326 अंतर्गत आरोपीस दोषी ठरवत कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व 1,000 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास 30 दिवसांची साधी कैद सुनावली आहे. तसेच कलम 324 अंतर्गतही कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र कलम 504 व 506 अंतर्गत आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.


या प्रकरणात सरकारी वकील म्हणून श्रीमती बडवे यांनी काम पाहिले. तसेच पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुपे व भोसले यांनी कोर्ट पैरवी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहर परिसरात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुमठे येथे ‘प्रो कबड्डी लीग २०२६’; माऊली प्रतिष्ठान आणि चांगभले स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजन

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी