सातारच्या आयटी हब साठी केंद्राने राज्याशी समन्वय करावा

खासदार उदयनराजे भोसले यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 26 March 2025


सातारा : सातारा शहरातील पायाभूत सुविधा, मुबलक जागा, चांगले हवामान, राष्ट्रीय महामार्गाचे सानिध्य, यामुळे पुण्यासारख्या महानगरावरील ताण कमी करून आयटी हब साठी सातार्‍यात प्रयत्न होणे गरजेचे आहे त्यासाठी केंद्राने राज्य शासनाची समन्वय साधून एक प्रमाणित पद्धत अवलंबावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय माहिती प्रसारण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे केली आहे.

दिल्ली येथे खा. उदयनराजे यांनी अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार आयटी प्रकल्पांची स्थापना त्रिस्तरीय म्हणजेच लहान, मध्यम आणि मोठ्या शहरांमधून करण्यात यावी. यामध्ये सातारा शहर हे मध्यम रचनेतील आहे. येथे पुरेशी जागा उपलब्ध होणे शक्य आहे. संतुलित पर्यावरण पूरक स्थानिक विकास या माध्यमातून साध्य होणार आहे. तसेच दैनंदिन निर्वाह महानगरातील खर्चापेक्षा कमी खर्चात आयटी हब उभे राहणार आहे. केंद्र शासनाने राज्य शासनाशी सल्ला मसलत करून याबाबतचे धोरण ठरवावे. त्या कंपन्यांना शासकीय निधी शासनासंबंधी सहकार्य तसेच आयटी प्रकल्पांची स्थापना त्रिस्तरीय शहरांमध्ये करण्याबाबत लागणार्‍या अटी-शर्तींची पूर्तता याबाबत तातडीने आराखडा बनवावा. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप द्वारे शासकीय उपक्रमाद्वारे खाजगी आयटी कंपन्या देखील सातार्‍यात स्थापन करता येणे शक्य आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडलेली वस्तुस्थिती निश्चित स्वागतार्ह आहे. याबाबत राज्य शासनाशी लवकर समन्वय साधून धोरण आखू, असे आश्वासन अश्विनी वैष्णवी यांनी दिले. सातारा येथे आयटी हब निर्माण करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांचे अत्यंत तळमळीने प्रयत्न सुरू आहेत, असे या पत्रकात नमूद आहे. यावेळी काका धुमाळ, ऍडव्होकेट विनीत पाटील व करण यादव उपस्थित होते.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'छावा'च्या रिलीजआधी अक्षय खन्नाने केलेलं मोठं वक्तव्य
पुढील बातमी
अजिंक्य स्वयंचलित रिक्षा संघटनेचे पोलीस उपाधीक्षकांना निवेदन

संबंधित बातम्या