नवी दिल्ली : तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारवर ताशेरे काही दिवसांपासून तिरुपती मंदिरात मिळणाऱ्या लाडू प्रसादात भेसळ असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने आंध्रप्रदेश राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत.
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला म्हंटले की, लाडू प्रसाद तपासाचा निकाल न निघता माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती?. सुप्रीमकोर्टाने मुख्यमंत्र्यांनाही याबाबतचा जाब विचारला. कोर्टाने म्हंटले की, SIT ने कुठपर्यंत तपास केला? मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण द्यावं. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून जबाबदारीची अपेक्षा आहे. अहवाल जुलै मधे आला मग सप्टेंबर महिन्यात त्यावर भाष्य का केले? तुम्हीच अशी विधान करत असाल तर मग तपासाची काय गरज? असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. तसेच सुप्रीम कोर्टाने म्हंटले की, देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. अहवाल पाहता प्रथमदर्शनी असे दिसते की प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरली गेली नव्हती.