जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे. ही महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला होता.
खासदार राऊतांच्या आरोपांनंतर जयकुमार गोरे यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 2017 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये त्याबाबत न्यायालयाचा निकालही आला. माझी त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. मी असे कोणतेही फोटो पाठवले नाही. तसेच, जप्त मुद्देमाल आणि इतर गोष्टीही नष्ट कऱण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या देशात लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वोच्च न्यायालय आहे. कोर्टाच्या निकालाला 6 वर्ष झालीत. या घटनेला सहा वर्षे झाली. सहा वर्षांनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला. किमान आपण कुठल्या वेळी हा विषय बोलावा आणि कुठल्या वेळी काय समोर आणावं हे विरोधकांनीही याची विरोधकांनीही मर्यादा ठेवली पाहिजे. ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष केला, मला शिकवलं, वाढवले आणि इथपर्यंत आणलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अस्थी विसर्जनही करू दिले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी केले, असाही आरोप त्यांनी केला. विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. राजकारणात अनेक गोष्टी असतात. पण मी जबाबदारपणे काम करतो. मी एवढचं सांगतो की या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. त्या सर्वांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहे.
तसेच, माझ्यावर आरोप करणार्यावर मी अब्रुनुकसानीचाही खटला दाखल करणार आहे. या प्रकरणावर जी कारवाई करणे गरजेचे आहे ती सर्व कारवाई मी करणार आहे. जयकुमार गोरेंनी महिलेला त्रास दिला की नाही दिला, यासंदर्भात पोलिसांनीच चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. जे कोणी माझ्याविरोधात कट रचत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.