सातारमध्ये 23 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा नाही

पाणी जपून वापरण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

by Team Satara Today | published on : 20 May 2025


सातारा : कास तलावाच्या नवीन पाईपलाईनचे आउटलेट धरणाच्या मूळ पाईपलाईनला जोडण्याचे काम सुरू आहे . या कामामुळे दिनांक 23 ते 25 मे दरम्यान शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे तीन दिवस नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.

दिनांक 23 मे रोजी सातारा शहरातील सायंकाळच्या सत्राचा कास धरणाचा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा तसेच कात्रेवाडा टाकी क्षेत्रातील भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

शनिवार दिनांक 24 व रविवार दिनांक 25 रोजी कास माध्यमातील सकाळ-सत्राचा पॉवर हाऊस येथून होणारा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी,  कोटेश्वर टाकी या टाक्यांच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील बोगदा ते चांदणी चौक तसेच राजवाडा पिछाडी भाग या भागांना पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगतापवाडी येथील निकृष्ट कामाचा ठेकेदाराला दणका
पुढील बातमी
मुसळधार अवकाळीने सातारा परिसराला काढले झोडपून

संबंधित बातम्या