सातारा : सध्या सोशल मिडीयावर 1 मार्च 2020 नंतर दोन्ही पालक अथवा एका पालकाचा मृत्यू झाला आहे. बालकांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, अशा कुटूंबातील 2 मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा 4 हजार रुपये मिळणार आहेत. त्याचे फॉर्म तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरुन जिल्हा बाल संरक्षण कक्ष/जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे असा मजकूर येत असून काही पालक सदर योजनेच्या अनुषंगाने चौकशी करत आहेत. परंतू मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना माहिला व बालविकास विभागामार्फत राबविली जात नाही.
लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. अशा अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर तसेच अशा अफवा असलेल्या सोशल मिडीया पोस्टवर विश्वास ठेवू नये व आर्थिक फसवणूकीस बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.