जनावरांच्या कत्तलीप्रकरणी तिघांवर गुन्हा

एकाला अटक

by Team Satara Today | published on : 27 August 2025


फलटण : कुरेशीनगर येथे जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल केला. यातील एकाला अटक केली आहे.

बिलाल रफिक कुरेशी, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सायरा रफिक कुरेशी व वसीम रफिक कुरेशी (रा. कुरेशीनगर फलटण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत फलटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुरेशीनगर परिसरात संशयित स्कॉर्पिओ (क्र. एमएच 13 एसी 2324) व छोटा हत्ती टेम्पो (क्र. एमएच 11 डीडी 5530) या वाहनांतून जनावरे आणून त्यांची कत्तल केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करुन तब्बल 20 हजार रुपयांचे मांस व कातडी, 3.50 लाखांची स्कॉर्पिओ, 4 लाखांचा टेम्पो व सुमारे 7 हजारांची मोठी पातेली असा एकूण 7 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या गुन्ह्यातील संशयित बिलाल कुरेशी हा सातारा जिल्ह्यासह शेजारच्या तालुक्यांतून हद्दपार असूनसुद्धा त्याने फलटण शहरात प्रवेश करून कत्तलीत मदत केली. दरम्यान, वसीम कुरेशी हा पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप लोंढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
…आता साताऱ्यातही मराठा आंदोलनाच्या तयारीला वेग
पुढील बातमी
पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

संबंधित बातम्या