सातारा : पाण्यात बुडल्याने एखादा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मालगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डावा कालव्यात अरुण हरी परिवार (वय ११, सध्या रा. किकली, ता. वाई मूळ रा. नेपाळ देश) या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. १० मे रोजी घडली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. परिवार कुटुंब माेलमजुरी करुन गुजराण करत आहे. सध्या मालगाव परिसरात ते उपजिवीकेसाठी वास्तव्य करत आहेत.