सातारा : अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेल्या विमान अपघातामध्ये 241 प्रवाशांसोबत निवासी डॉ. आणि विमान कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यांना आज सातारा शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणाहून एअर इंडिया कंपनी विमानाने उड्डाण केले आणि अपेक्षित उड्डाण न गाठताच ते वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतीगृहावर कोसळले. त्यामध्ये निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे व काहीजण जखमी झाले. ही सर्वात दुर्दैवी घटना आहे. या अपघातामुळे खर्या अर्थाने अनेकांच्या स्वप्नाची राख रांगोळी पाहण्यास मिळाली. या सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सातारा येथील शासकीय विश्रामगृह मध्ये शिवसेना नेते व माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, पहिला संघटिका शारदा जाधव, सैनिक फेडरेशनच्या विद्या बर्गे, विराज खराडे, विकास शिंदे, माजी सैनिक व शिवसैनिक निकम, गोडसे, विश्वासराव माने, निलेश मोरे, विजय पाटील, राजेंद्र माने, गणेश भोसले, राजेंद्र घाडगे, डॉ. धैर्यशील माने, संगीता पवार, विमल सुपनेकर, प्रिया झांजुर्णे, रूपाली शिंदे, मुमताज मुलाणी, नीलम येवले, सुनीतादेवी सावंत, सीमा गायकवाड, कांचन घोरपडे, सुवर्णा पाटील, माया चौधरी, विजया कोळेकर, नीता काटकर, साधना भोसले, रूपा लेंभे, आशा वीर, नंदिनी गायकवाड, नीता दणाणे, उमा जाधव, उज्वला अहिरे, साधना भोसले, आसमा मुलाणी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या वेळेला मान्यवरांनी मानवता भावनेतून मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.
केंद्र व राज्य सरकार जखमींवर उपचार करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी या घटनेनंतर जखमींवर उपचार व्हावा व इतर मदत कार्यासाठी परिश्रम घेत आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली. अहमदाबाद ते लंडनला निघालेल्या विमान अपघाताने अनेकांचे स्वप्न भंगले असले तरी नव्या जिद्दीने त्यांना पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळो. तसेच मृतात्म्यांना शांती लाभो यासाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली व दोन मिनिटे स्तब्धता राखून श्रद्धांजली वाहण्यात आली.