सातारा : महामानवांना अवतार म्हणून विशिष्ट समाज पुढे करीत आहेत. दैवत म्हणून पुढे चमत्कार घडवला जात आहे. याशिवाय,चारित्र्याचे जाणीवपूर्वक हनन करीत आहेत.ते थांबले तरच विज्ञानवादी राष्ट्र व समाज निर्माण होईल. असे प्रतिपादन डॉ.जयसिंह ओहोळ यांनी केले.
गारवडे,ता.पाटण येथे संयुक्त जयंती महोत्सव समिती व बोधीसत्व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६९ वी जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा डॉ.प्रा.जयसिंह ओहोळ मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष सुभाष शिंदे होते.
डॉ.जयसिंह ओहोळ म्हणाले, "दैवतीकरण करून बहुजनांवर भुरळ घातली जात आहे. कारण, त्यांना विचार खंडीत जाण्यासाठीच अट्टाहास आढळून येत आहे. तेव्हा बळी न पडता संघटन वाढवले पाहिजे." महापुरुषांच्या नावाचा गजर केला जात असून दुसऱ्या बाजुने संविधानावर हल्ला करण्याचे षढयंत्र चालु असल्याचाही हल्लाबोल डॉ.ओहोळ यांनी विविध उदाहरणे देवुन केला.
भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका मंगलताई शिंदे म्हणाल्या,"बाबासाहेबांमुळे समाजाची प्रगती झाली आहे. शिकलोय म्हणजे हुकलोय असे नाही. तेव्हा वर्षभर त्यांच्या विचारांचा जागर व अभ्यास करीत असताना एक दिवस नाचायला हरकत नाही."
डॉ.बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले,"भ.गौतम बुद्ध ३० वर्षाचे असताना सर्वस्वाचा त्याग करून कपिलवस्तू सोडले.नंतर राजगृह सोडल्यानंतर, "गया" याठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली.त्यांचेच विचार सम्राट अशोक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगभर पसरवले.तेव्हा बुद्ध तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्याने इतर गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. बुद्धांनी महिलांना संघ गणात प्रवेश दिला होता. तेव्हा कोणताही भेदभाव करता Plus नये.सर्वच क्षेत्रात आपला समाज आघाडीवर आहे.मात्र, केवळ संघटन नसल्याने राजकीय यश मिळत नाही." केंद्रीय शिक्षिका यांनी एक दिवस नाचायला हरकत नाही.असे भाष्य केल्यानंतर तोच धागा पकडत अनिल वीर यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, "आधुनिक समाज निर्मिती करणाऱ्या महापुरुषांसाठी आनंदोत्सव साजरा करायला काहीही हरकत नाही.मात्र, व्यसनाव्यतिरिक्त जल्लोष झाला पाहिजे.डोक्यात घेतो तोच समाजमन जपत कार्यरत असतो." अशीही वीर यांनी पुष्टी जोडली.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले.बोधिसत्व सामाजीक संस्थेचे अध्यक्ष शंकर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रीय शिक्षका मंगलाताई बळीराम शिंदे व महिला मंडळ यांनी ध्वजारोहणसह संपूर्ण विधी पार पाडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी, उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.दोन दिवसीय कार्यक्रमात भारतीय कर्मचारी संघाचे अमर कांबळे, ऍड.बळीराम शिंदे,सुभाष शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केली. संपूर्ण गावातून भव्य-दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. समारोपप्रसंगी गीत प्रभात म्युझिकल नाईटचे सूरज कांबळे आणि त्यांची सर्व अंध टीमने भीमबुद्ध गीते सादर केली.याकामी, समिती,संस्था, माता रमाई महिला मंडळ,शिंदे, कांबळे, उथळे आदी परिवाराने अथक असे परिश्रम घेतले.