क्षयरोग कशामुळे होतो?

अशी लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा अन्…

by Team Satara Today | published on : 21 December 2024


एक असा आजार ज्याचे उपचार तर आहेत पण तो कितीवेळात बरा होऊ शकतो याची काही शाश्वती नाही. असा आजार ज्याने बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागतो. तो आजार म्हणजे क्षयरोग. हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो अनेकदा फुफ्फुसांना नुकसान पोहोचवतो. हा सर्वात मोठा संसर्गजन्य किलर मानला जातो.

काही वेळेला या आजारीची लागण झाली आहे हे समजायला वेळ लागतो आणि मग हा आजार बळावत जातो. पण जर आपल्याला या आजाराच्या लक्षणांची थोडी जरी कल्पना असेल किंवा माहिती असेल तर आपण सुरुवातीपासून याची काळजी घेत लगेचच उपचार घेण्यास सुरुवात केली तर कदाचित हा आजार बरा होण्याची शक्यता असते.

या आजाराची लक्षणे काय असतात?

रक्तासह सतत खोकला किंवा कोरडा खोकल, थकवा, वजन कमी होणे, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे, सतत थंडी वाजणे ही टीबीची लक्षणे आहेत. जेव्हा संक्रमित व्यक्ती सतत खोकते, शिंकते किंवा तिच्या बोलण्याच्या माध्यमातूनही क्षयरोग हवेतून पसरतो.

क्षयरोगाची कारणे

धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते आणि टीबीची शक्यता वाढते. उपचार न केल्यास, टीबीमुळे फुफ्फुसाच्या ऊतींना कायमचे डाग येऊ शकतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, व्यक्तीला फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो. फुफ्फुस आणि छातीच्या भिंतीमध्ये द्रव जमा होऊ शकतो. ज्यामुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

टीबी मणक्याच्या हाडांनाही संक्रमित करू शकतं, ज्यामुळे पाठदुखी होते आणि पाठीच्या कण्यावर दबाव पडतो. विलंब न करता क्षयरोगाचे ठोस असं निदान करणे ही काळाची गरज आहे जेणेकरून या आजारावर त्वरित उपचार मिळून रुग्ण बरे होऊ शकतात.

क्षयरोगाचे उपचार

क्षयरोगाचे लवकर निदान होणे हा रुग्णांसाठी पुढचा धोका टळण्यासाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीमध्ये खोकला आणि श्वास लागणे यांसारखी लक्षणे दिसली तर त्यांनी ताबडतोब तज्ञाचा सल्ला घेणं गरजेच आहे. टीबीचे निदान करण्यासाठी आणि वेळेवर उपचार सुरू करण्यासाठी एएफबी स्मीअर, जीन एक्सपर्ट चाचणी, टीबी डीएनए पीसीआर, टीबी कल्चर आणि औषध या महत्त्वाच्या चाचण्या आहेत.

टीबीमुळे शरीरावर काय परिणाम होतो?

मॅनटॉक्स ट्यूबरक्युलिन स्किन टेस्ट (टीएसटी) आणि इंटरफेरॉन-गॅमा रिलीझ एसे (आयजीआरए), सीटी स्कॅन, एक्स-रे, थुंकी आणि फुफ्फुसातील द्रव यासाठी रक्त तपासणी करावी लागते. तसेच या आजाराचे त्वरीत निदान होणं गरजेच आहे कारण यामुळे रुग्ण यातून बरे होऊ शकतात. तसेच त्या व्यक्तीपासून इतरांनाही त्या आजाराचा प्रसार होण्याचा धोका कमी होतो.

जसे की एचआयव्ही रूग्णांसाठी लवकर झालेलं निदान जीवन वाचवणारं असू शकतं कारण त्यावरून त्या रुग्णांना योग्य ते उपचार देणे शक्य होतं.क्षयरोगाशी लढा देण्याच्या बाबतीत, अचूक निदान हाच सर्वप्रथम उपाय.

तसेच अजूनही टीबीबद्दल योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेच आहे. कारण बऱ्यापैकी अनेकांना टीबीबद्दल हवी तेवढी जागृकता नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा या आजाराची लक्षणे लक्षात न आल्यानं याचा गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो. त्यामुळे या आजाराबद्दल माहिती असणं फार गरजेच आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फडणविसांची सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी घेतली भेट
पुढील बातमी
बांगलादेशात वर्षभरात २२०० हिंदूवर हिंसाचार

संबंधित बातम्या