सातारा : धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणातमोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे त्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी धरण पायथा विद्युतगृहा मधून ५०० क्युसेक ने दिनांक 19 जून 2025 रोजी सायंकाळी 7 पासून पाणी वेण्णा नदीपात्रात सोडणे आवश्यक आहे.
दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 6 पासून सांडव्या वरून वेण्णा नदी पात्रात अंदाजे 1000 क्युसेक पाणी सोडण्यात येईल आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या येवानुसार धरणामधून सोडण्यात येणार्या विसर्ग मध्ये बदल करण्यात येईल. धरणामधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
वीर धरणातून दोन हजार क्यसेक्सने विसर्ग : आज दि. २० जून रोजी सकाळी पावसाचे प्रमाण पाहाता सकाळी ६ वाजता दोन हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी केले आहे.