पालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी

संभाजी ब्रिगेडचे उपमुख्याधिकार्‍यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 20 June 2025


सातारा : सातारा पालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कराची थकबाकी रक्कम जास्त असते. त्या रकमेचा भरणा आर्थीक अडचणी मुळे वेळेवर होत नाही. यामुळे सातारा पालिकेने मालमत्ता करावरील शासकीय माफी साठी अभय योजना जाहीर केली आहे. 

ही योजना नागरीकांच्या हितासाठी असून ती काही नागरिकांपर्यंत पोहचली नाही. तरी 19 जून पर्यंत म्हणजे खूप कमी कालावधी असून सर्व नागरिकांना याचा फायदा मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे प्रशासनाने मुदत वाढवावी, अशी विनंती असलेले निवेदन उपमुख्याधिकारी यांना संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष रफीक शेख यांनी दिले.

यावेळी तालुका अध्यक्ष आशिष खवळे, सातारा शहर अध्यक्ष अमोल नलावडे, संघटक महेश गराटे, मेहबूब पठाण, प्रदीप खवळे, इम्रान कच्छी, सचिन जाधव, नजीम बागवान, प्रताप जाधव, योगेश पवार आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्रोही तर्फे यंदाही वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबिर
पुढील बातमी
शुक्रवार पेठेतील विद्युत खांब बदला, अन्यथा उपोषण

संबंधित बातम्या