महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने 'भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन'

by Team Satara Today | published on : 07 June 2025


मुंबई : रेल्वे मंत्रालयाच्या IRCTC च्या वतीने व महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने 'भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन' या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' सुरु करण्यात येत आहे.  हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाला मानवंदना देणारा असून. नागरिकांना तसेच पर्यटकांना छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित प्रमुख किल्ल्यांप्रमाणेच त्याभोवतीच्या धार्मिक स्थळांचा अविस्मरणीय प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. 

ऐतिहासिक व सांस्कृतिक इतिहासाची ओळख व्हावी, तसेच त्यांना या ठिकाणी पर्यटनाची संधी मिळावी, यासाठी आयआरसीटीसीने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या साहाय्याने ऐतिहासिक सहल आयोजित केली आहे. या सहलीत पर्यटकांना रायगड, शिवनेरी, पन्हाळा. प्रतापगड या किल्ल्यांसह महाराष्ट्रातील निवडक देवस्थानांवर फिरण्याची संधी मिळणार आहे. सहा दिवसांच्या या सहलीत मुक्कामासह प्रवास विमा, जेवणाची व्यवस्था, तिकीट, पर्यटनस्थळी फिरण्यासाठी वस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येत्या ९ जून, २०२५ रोजी ५ रात्री व ६ दिवसांची हो विशेष सहल रवाना होणार आहे. या विशेष सहलीअंतर्गत रायगड जिल्हायातील रायगड किल्ला पुणे जिल्हायातील लाल महाल, कसवा गणपती व शिवसृष्टी, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर ज्योतिर्लिंग. सातारा जिल्हायातील प्रतापगड किल्ला, कोल्हापूर जिल्हायातील महालक्ष्मी मंदिर व पन्हाळा किल्ला आदी ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटन स्थळे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. सद्यस्थितीत 'भारत गौरव यात्रा टुरिस्ट ट्रेन' यांचे ७०० सीटचे आरक्षण झाले आहे. (Sleeper category - ४८० seats, Comfort ३ AC १८०, Comfort R AC ४०) त्याअनुषंगाने, मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा परिषद व मा. पोलिस अधिक्षक (पुणे/रायगड/ सातारा/कोल्हापूर) यांच्यामार्फत स्थानिक प्रशासनास सदर बाबतीत सूचित करण्यात आले आहे. पर्यटन संचालनालयामार्फत या विशेष  सहलीअंतर्गत येणाऱ्या पर्यटनस्थळी "समन्वय अधिकारी नियुक्त करणेत आले आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनामार्फत या सर्व ठिकाणी आरोग्य पथके नियुक्त केली जाणार आहेत व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण खबरदारी घेणेत येणार आहे. असे शमा पवार, प्रभारी उपसंचालक विभागीय पर्यटन कार्यालय, पुणे यांनी कळविले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षा नदीत, पाण्यात विसर्जित न करता वृक्षलागवड
पुढील बातमी
तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!

संबंधित बातम्या