लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट

अनेक लष्करी तळ बेचिराख

by Team Satara Today | published on : 10 May 2025


नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान युद्ध संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार भारतीय ड्रोन्सने हा हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय ड्रोनने लाहोर मधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली होती.  त्यानंतर याच परिसरत पाकिस्तानचे (Pakistan) अत्यंत महत्त्वाचे स्थळ उध्वस्त झालं आहे. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे जरी अद्याप समोर आलेलं नसलं तरी दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानच्या मुळावर हा मोठा आघात मानला जात आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या सरगोधा हवाई तळावर मोठा स्फोट करण्यात आला आहे. याआधी पाकिस्तानचे पाच हवाई तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा भारतीय सैन्याने दिला आहे. या स्फोटात पाकड्यांचं मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानची तिसऱ्या दिवशीही खुमखुमी भारतीय सैन्यांना पुन्हा एकदा जिरवली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमधीळ अनेक लष्करी तळ निस्तनाबूत केल्याची ही माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लॉन्च करण्याचा तळ बेचिराख करण्यात आला आहे. याच तळावरनं पाकिस्तान वारंवार ड्रोन हल्ला करत होता. वेळोवेळी भारतीय सैन्यांने हा हल्ला वरच्यावर वर उधळून लावला आहे. अशातच भारतीय लष्कराच्या या कारवाईने पाकिस्तानला पुन्हा एक हादरा बसला आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून तिसऱ्या दिवशीही ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हल्ले सुरूच असल्याचे बघायला मिळाले आहे. पाकिस्तानकडून ड्रोन आणि हलक्या विमानांद्वारे हे हल्ले केले जात आहे. भारताच्या लष्करानं निवेदन प्रसिद्ध करुन ही माहिती दिली आहे. अमृतसरच्या खासा कँटोनमेंटवर अनेक ड्रोनद्वारे अपयशी हल्ले करण्यात आले. पहाटे पाच वाजता पाकने अमृतसरवर ड्रोन हल्ले केलेत.  परिणामी भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकचे हे ड्रोन हवेतच उडवलेत. भारताची सार्वभौमता आणि नागरिकांवरचे हल्ले खपवून घेणार नाही, अशी कठोर भूमिका भारतीय लष्करानं घेतली आहे. 

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री भारताच्या हवाई तळांवर हल्ले करण्यात आले होते. पाकिस्तानकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तानच्या फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही वापर करण्यात आला. जम्मू एअर बेस,उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस आणि बियास या हवाई तळांवर पाकिस्तानी ड्रोन्सचा हल्ला झाला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हळदीच्या ओल्या अंगाने 'तो' सीमेवर रवाना…
पुढील बातमी
महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेचा पर्याय

संबंधित बातम्या