मधुमेहावर अत्यंत उपयुक्त घरगुती उपाय

लगेच कंट्रोलमध्ये येते शुगर लेव्हल

by Team Satara Today | published on : 13 November 2024


मधुमेह ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे इतर अनेक आजारांचा धोका असतो. हा एक जीवनशैलीवर आधारित आजार आहे. जो खराब जीवनशैलीमुळे जगभरातील प्रौढांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच होतो. भारतात सुमारे 50 लाख लोक या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले जाते. मेयो क्लिनिकच्या मते, टाइप 2 मधुमेह ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर योग्यरित्या इन्सुलिन तयार करत नाही किंवा वापरत नाही. हा आजार आपल्याला आतून पोकळ बनवतो. यामध्ये औषधांद्वारे उपचार करणे खूप महत्वाचे आहे. परंतु काही घरगुती उपाय देखील तुमच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील.

दालचिनी :

दालचिनीमध्ये मधुमेह नियंत्रित करणारे गुणधर्म आहेत. दालचिनीमध्ये असलेले एक पदार्थ इन्सुलिनचे उत्पादन वाढवू शकते. हे इन्सुलिनच्या उत्पादनात मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करते.

कारले :

कारल्यामध्ये असलेले पोषक तत्व तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करतात. याच्या सेवनाने इन्सुलिनचे उत्पादनही वाढते. दररोज सकाळी एक ग्लास कारल्याचा रस पिणे फायदेशीर आहे. जसे की, पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स, मधुमेहाच्या उपचारात मदत करतात. कारल्यामुळे रक्तही शुद्ध होते.

मेथीदाणे : 

मेथीकडे औषधी वनस्पती म्हणूनही पाहिले जाते. मेथीमध्ये असलेले फायबर आणि अल्फा-ग्लुकोसिडेस रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो.

अंबाडीच्या बिया (फ्लेक्स सीड्स) : 

अंबाडीच्या बियांमध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, जे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याचे सेवन वजन कमी करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, अंबाडीच्या बियांचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांमध्ये साखरेची पातळी 28 टक्क्यांनी कमी होते.

बेलपत्र : 

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बेलच्या झाडाच्या पानांमध्ये रक्तातील साखर, युरिया आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असू शकते. हे रक्तातील साखरेची अचानक वाढ टाळण्यास देखील मदत करू शकते जी सामान्यतः जेवणानंतर होते. यासाठी बेलाच्या पानांचा डेकोक्शन किंवा चहा बनवून डॉक्टरांच्या सल्ल्याने पिऊ शकता.

ऍपल सायडर व्हिनेगर :

2021 च्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, एक ते दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून खाल्ल्याने लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. हे शरीराला इंसुलिनसाठी अधिक संवेदनशील बनवते, स्नायूंना रक्तप्रवाहातून अधिक साखर काढून टाकण्यास मदत करते आणि अन्न पचन होण्याचा वेग कमी करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात मुलाचा मृत्यू
पुढील बातमी
'ये काली काली आँखे' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज

संबंधित बातम्या