शिवगौरव पुरस्काराचे दिमाखात वितरण

अजय जाधवरावांचे व्याख्यान: सामर्थ्य सोशल फौंडेशनचा उपक्रम

by Team Satara Today | published on : 10 June 2025


सातारा : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सामर्थ्य सोशल फौंडेशनने सातार्‍यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांना श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते ’शिवगौरव पुरस्कार 2025’ देवून सन्मानित करण्यात आले. तसेच इतिहासाचे अभ्यासक अजय जाधवराव यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेरणादायी विचार व ’उद्योजकता’ या विषयावर बांधकाम व्यवसायिक श्रीधर कंग्राळकर यांचे व्याख्यान आयोजित करत सामर्थ्य सोशल फौंडेशनने स्तुत्य उपक्रम राबवला.’शिवगौरव पुरस्कारा’मध्ये पत्रकारितेसाठी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, राजीव मुळ्ये, प्रगती जाधव शौर्य क्षेत्रातून धैर्या कुलकर्णी व शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्स वैद्यकीय क्षेत्रामधून डॉ.सुरेश शिंदे विधी क्षेत्रातून ड.श्रीकांत पन्हाळे, ड. आशिष राठोड पर्यावरण क्षेत्रातून कुरणेश्वर मॉर्निंग ग्रुप व अजिंक्यतारा निसर्ग मित्र ग्रुपला उद्योग क्षेत्रातून श्रीधर कंग्राळकर, बाळासाहेब जगदाळे तर कला क्षेत्रातील शाहीर भानुदास गायकवाड, भक्ती झणझणे व अमित देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. हे सर्व पुरस्कार श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी सामर्थ्य सोशल फौंडेशनचे अध्यक्ष ड. गणेश चोरगे, अजय जाधवराव, श्रीधर कंग्राळकर, ड.राजेंद्र गलांडे उपस्थित होते.इतिहासाचे अभ्यासक अजय जाधवराव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आजही समाजामध्ये प्रामुख्याने त्यांच्या शौर्याविषयीच्या ठरावीक घटनांबाबत बोलले जात आहे. महाराजांना जेवढे आयुष्य लाभले त्यापैकी केवळ 7 वर्षांच्या पराक्रमाबद्दलची समाजाला माहिती असून तेवढीच चर्चा होते. यामुळे उर्वरीत 43 वर्षांचे महाराजांचे कार्य, त्यांचे विचार समजणे ही काळाची गरज आहे. येणार्या पिढीला संपूर्ण शिवाजी महाराज समजले पाहिजेत. यासाठी समग्र शिवाजी महाराज हे सर्वप्रथम सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. किल्ले अजिंक्यतार्यावर शहाजीराजे, जिजामाता, छत्रपती संभाजी महाराज , महाराणी येसूबाई, छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाले आहेत. यामुळे याची महती सातारकरांनी जगाला सांगितली पाहिजे, असे इतिहासकार अजय जाधवराव यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी श्रीधर कंग्राळकर यांनी उद्योजक म्हणून नावारुपास यायचे झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, कौशल्य त्यांची निती कशी महत्वाची आहेत हे उलगडून सांगितले.सातारा बिझनेस सेंटर हॉलमध्ये व्याख्यान व पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यात आले. सामर्थ्य सोशल फौंडेशनच्या सामाजिक उपक्रमाची माहिती सूत्रसंचालक जयंत लंगडे यांनी सांगितली. शिवगौरव पुरस्कार नियोजन समिती व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनी सकाळी पोवई नाका येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सामर्थ्य सोशल फौंडेशनच्यावतीने दुग्धाभिषेक, जलाभिषेक करुन अभिवादन केले. यावेळी  कार्यक्रमास भाजपा लोकसभा संयोजक सुनील काटकर, भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे, भाजपा महिला प्रदेश सचिव रेणू येळगावकर, नगरसेवक सुनील काळेकर, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, जावळवाडीचे सरपंच विक्रम फडतरे, सातारा जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष सुनील झोरे, गजेंद्र ढोणे, सोनल हेंद्रे कुमठेकर, निलेश चोरगे, संदीप चोरगे, उमेश खंडुझोडे, आशिष गाडे, सागर चोरगे, रफिक शेख, ड ऋषिकेश वागडोळे, विजय गाडे, संतोष माने अनेक मान्यवर, फौंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी
पुढील बातमी
सत्यजित पाटणकर यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

संबंधित बातम्या