राज्यात पुढील ५ दिवस अतिवृष्टी

हवामान विभागाचा इशारा

by Team Satara Today | published on : 30 June 2025


मुंबई : यंदा मान्सूनने दरवर्षीपेक्षा लवकर हजेरी लावली असून राज्यातसह देशाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पहायला मिळाला आहे. यंदाच्या पावसाने सुरुवातीला गेल्या अनेक वर्षाचे विक्रम मोडीत काढले आहेत. याच मुसळधार पावसाने जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचा विचार करता आता पुढील ५ दिनस हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील ५ दिवसात मान्सून राज्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असून मध्यम ते मुसळधार आणि मुसळधार ते अतिमुसळधार अशी पर्जन्यवृष्टी होणार असल्याचं हवामान विभागाने वर्तविलेलं आहे.

यंदा सुरुवातीुपासून पावसाने कोकण विभागाला झोडपून काढले आहेत रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगगत असलेल्या गावांतील बाजारपेठांमध्ये देखील पाणी शिरल्याने जनजीवन विसक्ळीत झाल्याचं पाहायवला मिळालं. अशातच आता 5 जुलै पर्यंत कोकणासहा मराठावाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते सरासरी वेगाने पाऊस होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

संपूर्ण विदर्भ आणि रायगड आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे, आणि त्मयाचबरोबर मराठवाडामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. याचबरोबर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट
पुढील बातमी
पावसाळ्यात चिलट, मुंग्या, माशांचा होतोय त्रास

संबंधित बातम्या