इंदापूर प्रशासकीय भवन या ठिकाणी ईव्हीएम विरोधी आंदोलन

ईव्हीएम हटाओ देश बचाओच्या जोरदार घोषणा

by Team Satara Today | published on : 13 December 2024


इंदापूर : ईव्हीएम हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि.१२) इंदापूर प्रशासकीय भवन या ठिकाणी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी अनेकांनी ईव्हीएम विरोधात रोष व्यक्त करीत इथून पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी केली. प्रसंगी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते ॲड. राहुल मखरे, राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल भिसे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, प्रा. कृष्णा ताटे आदींनी आपल्या भाषणातून ईव्हीएम संदर्भात रोष व्यक्त केला.प्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे राज्य सरचिटणीस संदिपान कडवळे, शहराध्यक्ष ॲड. ईनायतअली काझी, हनुमंत कांबळे, ॲड. आशुतोष भोसले, सुरज धाईंजे, मयूर शिंदे, समद सय्यद, हमीद आतार, विकास खिल्लारे, श्रीकांत मखरे, अक्षय कोकाटे, बाबासाहेब भोंग, गौस सय्यद, सचिन बेसरे, नितीन देशमाने, स्वप्निल देशमाने, सतीश आढाव, गणेश चंदनशिवे, भारत चंदनशिवे,नागेश भोसले, संजय शिंदे, अनिकेत निंबाळकर, स्वप्निल सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांनी ईव्हीएम हटाव देश बचाव. भारतीय संविधानाचा विजय असो. मत देणे आमचा अधिकार असेल तर त्याचा हिशोब मागणे हा सुद्धा आमचा अधिकार आहे, अशा आशयाचे बॅनर झळकवीत ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीचे दहन केले.

ईव्हीएमच्या माध्यमातून मुक्त वातावरणामध्ये नि:पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होत नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात ईव्हीएम विरोधी उठाव होत असताना निवडणूक आयोगाने उत्तर देणे आणि शंकेचे निरसन करणे गरजेचे आहे. परंतू ईव्हीएम ला भाजप आणि आरएसएसचे लोक समर्थन देत आहेत, याचा अर्थ ईव्हीएम चा थेट फायदा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना होत असल्याचे स्पष्ट होत आहे. – ॲड. राहुल मखरे (प्रदेश प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल पाहिले तर महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गाझा पट्टीमधील पोस्ट ऑफिसवर झालेल्‍या हल्‍ल्‍यात 30 पॅलेस्टिनी ठार
पुढील बातमी
भारतात मलेरियाच्या रुग्ण संख्येत घट

संबंधित बातम्या