बेईमान ऑफ द महाराष्ट्र पुरस्कार उद्धवजींना द्यावा : आशिष शेलार

by Team Satara Today | published on : 12 June 2025


कराड : बेईमानीची व्याख्या उद्धव ठाकरे गटाला शिकवावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. खासदार संजय राऊत हे त्याचे मूळ आहेत. आमच्यासोबत निवडणूक लढवित मते मिळवित सत्तेसाठी त्यांनी बेईमानी केल्याचे सांगत बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड उद्धव ठाकरे यांना द्यावा लागेल, हा इतिहास संजय राऊत यांनी लक्षात घ्यावा अशी जोरदार टीका माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

ना. आशिष शेलार हे कराड दौर्‍यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर हे यावेळी उपस्थित होते. ना. आशिष शेलार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे नेते पै. चंद्रहार पाटील यांनी स्वतःहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील टीका निरर्थक असून बेईमान ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार उद्धव ठाकरे यांना द्यावा लागेल आणि संजय राऊत हे त्याचे मूळ असल्याची टीका केली.

भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. त्यांनी मुंबईतील झाडाच्या कटिंगवरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दरवर्षीचा सहा ते सात हजार झाडांचा खून केल्याचे म्हटले. तर चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशावरून बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड उद्धवजींना द्यावा लागेल अशी खोचक टीका केली. आदित्य ठाकरेचा अभ्यास कमी आहे. चुकीची माहिती घेऊन ते विषयांतर करण्यासाठी बोलत आहेत. मुंबईतील सर्वात जास्त झाडांचा खून आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना झाला आहे. त्यामुळे दुसर्‍यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. भाजप पक्ष आता सुदृढ होत आहे. त्यामुळे महायुती आणि भाजप मोठा होण्यासाठी सबका साथ सबका विकास या भूमिकेतून चालत आहे, असेही ना. आशिष शेलार यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा न्यायालयात जागतिक वृक्षारोपनाने पर्यावरण दिन साजरा
पुढील बातमी
सुरत, गुवाहाटीमार्गे आमचा भाजपा प्रवेश झालेला नाही : सत्यजित पाटणकर

संबंधित बातम्या