चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय

by Team Satara Today | published on : 24 October 2024


वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात. तसेच त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या असमतोलामुळे मेल्ज्मा होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये असलेला मेलेनिन हार्मोन त्वचेचा रंग ठरवतो. पण शरीरात मेलेनिनचे असामान्य उत्पादन होण्यास सुरुवात झाली की त्वचेवर काळे डाग येऊ लागतात. त्यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात.

सूर्यकिरणांनापासून त्वचेचा बचाव करा: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी सूर्यकिरणांनाच्या सानिध्यात गेल्यामुळे त्वचा काळी होण्यास सुरुवात होते. सूर्यची किरण त्वचेवर पडल्यानंतर त्वचा टॅन होऊन जाते. तर इतर वेळी वातावरणातील आद्र्रतेचा परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे उन्हात बाहेर जाताना चेहऱ्याला स्कर्फ बांधून बाहेर जावे. तसेच 30 SPF किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीनचा वापर करावा.

शरीर हायड्रेट ठेवणे: सर्वच ऋतूंमध्ये त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. यासाठी रोजच्या आहारात लिंबू पाणी, नारळ पाणी इत्यादींचे सेवन करावे. तसेच शरीराला पाण्याची आवश्यकता असते. नियमित ७ ते ८ लिटर पाण्याचे सेवन करावे. ज्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहील. शरीरातील ओलावा टिकून राहण्यासाठी आहारात विटामिन सी युक्त फळांचे आणि इतर भाज्यांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीर आणि त्वचा चांगली राहील.

कच्च्या बटाट्याचा रस लावावा: चेहऱ्यावर आलेले काली डाग घालवण्यासाठी कच्च्या बटाट्याचा रस लावावा. यासाठी एक बटाटा घेऊन त्यात साल काढून बटाटा किसून घ्या. किसून घेतलेल्या बटाट्यमधील पाणी काढून त्वचेवर लावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. बटाट्यामध्ये विटामिन सी चे प्रमाण जास्त असते.

मानसिक तणाव कमी घेणे: मानसिक तणाव घेतल्यास त्वचेसह शरीर बिघडून जाते. त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यासाठी कमीत कमी मानसिक तणाव घेणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होण्यास सुरुवात होते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने, ध्यान करणे आवश्यक आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार?
पुढील बातमी
राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या