इंदोली-पाल उपसासिंचन योजनेच्या सर्वेक्षणास सुरुवात

by Team Satara Today | published on : 20 May 2025


सातारा : हणबरवाडी टप्पा क्र.1 पुर्ण झाले असून टप्पा क्र.2 ची सुप्रमा अंतिम टप्यात आहे. या योजनेचे पाणी शेतकर्‍यांच्या बांधावर लवकरात लवकर येण्यासाठी जलद गतीने काम पुर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या. धनगरवाडी टप्पा क्र.1 पुर्ण झाले असून टप्पा क्र.2 चे काम जास्तीत जास्त पुर्ण झाले आहे. विद्युत विभागाचे काम चालू आहे. या योजनेचे पाणी नोव्हेंबरअखेर शेतकर्‍यांना शेतीसाठी उपलब्ध होणार आहे. इंदोली पाल उपसासिंचन योजना 50 मीटर हेड वरून 100 मीटर हेड करण्यास शासनाची मान्यता मिळाली असून त्याच्या सर्वेक्षणास सुरुवात झाल्याची माहिती आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली.

इंदोली ता.कराड येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व सर्वेक्षण करणारी कंपनी यांची संयुक्त बैठक पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुरेश पाटील, निवासराव निकम, बाळासाहेब साळुंखे, निखील संकपाळ, योगीराज सरकाळे, महेश जाधव उपस्थित होते.

यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे यांनी इंदोली पाल उपसासिंचन योजनेचे सर्वेक्षण लवकरच पुर्ण करून शेतकर्‍यांच्या शेतीसाठी जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सुचना संबंधित अधिकारी व कंपनीस केल्या. यावेळी प्रसाद साळुंखे, संदिप पाटील, शहाजी मोहिते, पांडुरंग सावंत, दिगंबर भिसे, अनिल माने, सागर साबळे, विकास निकम, शहाजी देशमुख, शरद भोसले, प्रमोद निकम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टेंबू उपसासिंचन योजनेमधून शामगाव, राजाचे कुर्ले, पारगाव, पुसेसावळी आदि गावांना पाणी देण्यासाठी शासन निर्णय झाला आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी 40 लक्ष रु. निधी उपलब्ध झाला आहे. त्याचे सर्वेक्षण येत्या आठवडयामध्ये चालू करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेस देण्यात आल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा अत्याचार
पुढील बातमी
लोकलच्या जनरल डब्ब्यात पुरुषाकडून महिलेला मारहाण

संबंधित बातम्या