अखिल भारतीय साहित्य संमेलनास सर्वतोपरी सहकार्य

खासदार उदयनराजे भोसले यांचा शाहूपुरी शाखेसह मावळा फाऊंडेशनला शब्द

by Team Satara Today | published on : 09 June 2025


सातारा : शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्यामुळे साहित्य संमेलनाचा मान साताऱ्याला मिळाला आहे. हे संमेलन सर्व ताकतीने यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी माझ्याकडून सहकार्य राहील, असे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना फोन करून सांगितले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या  पुढाकारामुळे साताऱ्यात संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलतं होते.

साताऱ्यात होणारे साहित्य संमेलन हे खा.उदयनराजे भोसले यांना बरोबर घेऊनच होणार आहे, असे विनोद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले आहे . साताऱ्यातील हे संमेलन उदयनराजे भोसले यांच्याशिवाय अधुरेच असणार आहे, त्यामुळे आपल्या सहभागाने या साहित्य संमेलनाची उंची वाढली जाणार आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये सहकार्याची आणि मार्गदर्शकाची भूमिका कायम ठेवली आहे .

मुंबई येथे भारत गौरव ट्रेनच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे . त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले मुंबईला रवाना झाले. याच दरम्यान, मुंबईला रवाना होण्यापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली

ते म्हणाले, साताऱ्यात 99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे .साहित्य मेळा भरण्यासाठी आणि तो यशस्वी करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे .यामध्ये सातारा लोकसभेचा खासदार म्हणून मी कुठेही कमी पडणार नाही .साहित्य उत्सवाचा महामेळा भरवणे हे एका कोणाचे काम नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे. हा रथ सर्वजण आपण सातारकर म्हणून एकत्रितपणे पुढे नेऊया. यामध्ये मी कोठेही कमी पडणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे भोसले यांनी कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी बोलताना दिली.

सातारा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेला अनेक दिग्गजांनी समृद्ध केलेले आहे. या समृद्धीला एक वेगळी किनार आहे. सातारा जिल्ह्याचा ग्रंथ महोत्सव दरवर्षी साहित्य परंपरांचा मेळावा भरवत असतो, त्याचा कळसाध्याय हा साहित्य संमेलनाच्या रूपाने साकार होत आहे. यामध्ये सर्व सातारकरांनी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी आपापली जबाबदारी निश्चितपणे पार पाडावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाच्या स्थळ समितीने साताऱ्यात भेट घेतली. साहित्य संमेलन साताऱ्यात घेण्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि अखिल भारतीय साहित्यंमंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी  यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच  साताऱ्याला संमेलनाचे आज यजमानपद मिळाले आहे.  महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा यांनी तब्बल बारा वर्षे साहित्य संमेलनाची मागणी केली होती. त्या मागणीचा मान राखून साहित्य संमेलनाचे नियोजन साताऱ्याकडे आले आहे. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ही दोन ऊर्जा स्थाने एकत्रितपणे सक्रिय आहेत .या ऊर्जा स्थानांचा साताऱ्यातील सर्व विधायक परंपरा आणि चळवळींना सातत्याने पाठिंबा असतो.

यामध्ये  खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा संमेलनाला संपूर्ण सहकार्याची भूमिका घेत संमेलनाच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या असून साहित्य संमेलनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.


संमेलनास सर्वतोपरी सहकार्य : ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर

ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर म्हणाले की, कराड येथे माजी आमदार विलासकाका उंडाळकर पाटील यांनी २००३ च्या कालावधीत मध्ये एक संमेलन घेतले होते. त्या संमेलनास तत्कालीन पंतप्रधान पी. व्हि. नरसिंहराव आले होते. हे संमेलन ताकतीने यशस्वी केले होते. या घटनेला उजाळा देत असतानाच त्यांनी सांगितले की, आता साताऱ्यात होणारे साहित्य संमेलन हे जिल्ह्याचे भूषण आहे. त्यामुळे या संमेलनास माझे सर्वतोपरी सहकार्य राहणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजधानी साताराने अनुभवला शिवकाल
पुढील बातमी
15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन सातारा येथे होणार

संबंधित बातम्या