पश्चिम बंगाल : गेल्या काही दिवसांपासून भारत-बांगलादेश सीमेवर सतत तणाव वाढत चालला आहे. अशातच पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सीमेवरून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश आणि पश्चिम बंगलाच्या एका भागात बांगलादेशी सैनिकांकडून दहशत माजवण्याचा प्रकार सुरू असतानाच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आणि स्थानिक गावकऱ्यांची बांगलादेशी सैनिकांसोबत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे.
बांगलादेशी सैनिक दहशत माजवत असताना बीएसएफच्या जवांनांसोबत त्यांच्या वादवादी सुरू झाली. पण त्याचवेळी स्थानिक गावकऱ्यांनीही या वादात उडी घेत बांगलादेशी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देण्यास सरूवात केली. सुरूवातीला दोन्ही सैन्यात मोठा वाद निर्माण झाला पण, नंतर भारतीय सैनिकांनी आणि स्थानिक नागरिकांनी बांगलादेशींना तिथून पिटाळून लावले.