पाठदुखी ही अनेकांसाठी अगदी सामान्य समस्या असते. सतत बैठे काम केल्याने किंवा महिलांच्या बाबतीत जास्त काळ ओट्यापुढे उभे राहिल्याने पाठदुखीची तक्रार उद्भवते असा आपला समज असतो. मग आराम केल्यावर किंवा थोडा व्यायाम केल्यावर हे पाठीचे दुखणे कमी होईल म्हणून आपण ते अंगावर काढतो. कधीतरी आपण पाठीला मसाज घेतो तर कधी एखादे तेल लावून हे दुखणे कमी होते का याची वाट पाहतो. पण केवळ बैठ्या कामाने किंवा गाडी चालवल्यानेच पाठ दुखते असे नाही. तर पाठदुखी मागे आहारातून पुरेसे पोषण न मिळणे आणि शरीरात विविध जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होणे ही मुख्य कारणे असू शकतात
आपल्याला याबाबत पुरेशी माहिती नसल्याने आपण अमुक एका कारणाने पाठदुखी होत असेल असा तर्क लावतो आणि दुखणे सहन करत राहतो. पाठ आणि कंबर दुखण्यामागे शरीरात ठराविक जीवनसत्त्वांची कमतरता हेही महत्त्वाचे कारण असते. तेव्हा याबाबत योग्य ती माहिती घेणे आणि पाठदुखी अंगावर न काढता त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा हे दुखणे वाढते आणि भविष्यात ते जास्त गंभीर होऊन बसते. पाहूयात कोणत्या २ कमतरता पाठीच्या दुखण्याचे महत्त्वाचे कारण ठरु शकतात.
१. व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता
आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर पाठ किंवा कंबरदुखी उद्भवू शकते. रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे व्हिटॅमिन बी १२ चे मुख्य काम असते. शरीरातील एनर्जी कायम ठेवण्यासाठी या व्हिटॅमिनची आवश्यकता असते. मात्र शरीरात एनर्जी कमी असेल, आणि बी १२ चीही कमतरता असेल तर कंबरदुखीची तक्रार उद्भवू शकते.
२. व्हिटॅमिन डी ची कमतरता
हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर कॅल्शियम शोषले जात नाही. कॅल्शियम शरीरात शोषले गेले नाही तर हाडे आणि पर्यायाने पाय, पाठ, खांदे असे सगळे अवयव दुखतात. म्हणूनच पाठदुखी होत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन आणि पर्यायाने कॅल्शियमची कमी असण्याची शक्यता असते.
म्हणूनच आहाराच सर्व प्रकारची खनिजे, व्हिटॅमिन्स यांचा समावेश राहील याची काळजी घ्यायला हवी. यासाठी सर्व भाज्या, फळे, कडधान्ये, डाळी यांचा आहारात समावेश करायला हवा. तर व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आवर्जून ऊन्हात बसायला हवे. तसेच कॅल्शियमसाठी दूध आणि दुधाचे पदार्थ, अंडी यांचा आहारात समावेश वाढवायला हवा.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |