शुक्रवार पेठेतील विद्युत खांब बदला, अन्यथा उपोषण
पत्रकार संदीप शिंदे यांचा वीज वितरणला इशारा
by Team Satara Today | published on : 20 June 2025

सातारा : गणेशोत्सव आगमनापूर्वी शुक्रवार पेठ येथील गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील विद्युत पोल बदलून व तारांची उंची वाढवा, असे निवेदन दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे मुख्य प्रबंधक यांना दिले होते. तब्बल दहा महिने झाले तरी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या वतीने कोणतीही या निवेदनावर कारवाई झाली नाही. त्यामुळे येत्या 15 ऑगस्ट पर्यंत सदर विद्युत पोल बदलून तारांची उंची वाढली नाही तर जिल्हाधिकारी सातारा यांच्या केबिनच्या बाहेर उपोषण करण्याचा इशारा संदीप शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा