सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमोल बजरंग कनवाळू रा. सदर बाजार, लक्ष्मी टेकडी, सातारा आणि तेथीलच इकबाल पापा शेख हे आपापसांत भांडण करून सार्वजनिक शांतता बिघडवीत असताना दिसून आले. याबाबत संबंधितांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार बसवंत करीत आहेत.
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 31 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा