कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात आता संघर्षाची ठिणगी पडली आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात शासनाकडून जमिनीची मोजणी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात कडाडून विरोधाचा एल्गार पुकारला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांनी 'आरपारच्या लढाई'चा थेट इशारा प्रशासनाला दिला आहे.