08:14pm | Dec 04, 2024 |
सातारा : देशासमोर भारतीय संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प साकार करण्याचे आव्हान आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये आयोजित केलेल्या 38 व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत संविधान जागरच्या ‘राष्ट्रवाद, अल्पसंख्यांक व संविधान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.आत्तर होते. विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे, विश्वस्त प्राचार्य डॉ.संजय कांबळे उपस्थित होते.
अन्वर राजन म्हणाले, भारतीय राष्ट्रवादाचा धर्मनिरपेक्षता, बंधुता व समता हा पाया आहे. राष्ट्र धर्म व भाषा या आधारे निर्माण होत नाही. फाळणीचा इतिहास सकारात्मक मांडण्याऐवजी खोट्या पद्धतीने सांगितला जातोय. खराखुरा इतिहास समजून घेण्याची गरज आहे. मुस्लिमांची भाषा प्रदेशनिहाय स्थानिकच आहे, हे वास्तव समजून घेतले पाहिजे.
आधुनिक भारतातील सर्वधर्मीयांना, अल्पसंख्याकांना पुरेसा अवकाश व नागरिकत्वाचे सर्व अधिकार मिळण्याची आवश्यकता आहे. देशात हिंदू मुस्लिम प्रश्न पेटवून त्यांचा नाहक छळ करण्यात येत आहे. जातीयता व अस्पृश्यतेचा चटका बसल्याने धर्मांतरित झालेले मुस्लिम, ख्रिश्चन इथलेच मूळ भारतीय आहेत. त्यांनी भारतीय संस्कृती, भाषा आदींचे वैविध्य टिकवून ठेवले आहे. सुफी संतांचे मठ सर्वांसाठी खुले राहिले आहेत. प्रबोधन चळवळींचा, धर्मांचा इतिहास समजून घेण्याची गरज आहे, असे अन्वर राजन यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य संजय कांबळे यांनी केले. प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |