या वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने यंदा कमी झाला आहे. या वर्षी कॉपी विरोधात कडक मोहिम राबवली होती. यामुळे निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
"राज्यात ११ फेब्रुवारी ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होत्या. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, ३७ ट्रान्सजेंडर. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.विभागनिहाय निकाल
पुणे-९१.३२ टक्केकोकण- ९६.७४ टक्केनागपूर- ९१.३२ टक्केछत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्केमुंबई- ९२.९३ टक्केकोल्हापूर- ९३.६४ टक्केअमरावती- ९१.४३ टक्केनाशिक – ९१.३१ टक्केलातूर – ८९.४६ टक्के