निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, सन 2002 मध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने सशस्त्र दलातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ व्हावी यासाठी पुढाकार घेऊन सातारा नगरपालिकेत ठराव पारित केला होता कालांतराने ठरावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांची घरपट्टी माफ केलेली आहे व त्याची पुरेपूर अंमलबजावणी मुख्याधिकारी या नात्याने अभिजीत बापट करत आहेत.
निमलष्करातील जवान सुद्धा आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी मोलाचे योगदान देत आहेत व देशाची सुरक्षा अबाधित ठेवत आहेत म्हणून त्यांना सुद्धा घरपट्टी माफ व्हावी त्यासाठी नगरपालिकेने ठराव पारित करावा जेणेकरून शासनाकडे पाठपुरावा करता येईल.