सातारा : संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी सातारा तालुक्यात विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे, याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.
संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी विविध गावांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेंद्रे 24 जानेवारी, अपशिंगे 27 जानेवारी, दहिवड 29 जानेवारी, तासगाव 31 जानेवारी, परळी 3 फेब्रुवारी, वडूथ 4 फेब्रुवारी, वर्ये 10 फेब्रुवारी, अंबवडे 11 फेब्रुवारी, कण्हेर 12 फेब्रुवारी, खेड 14 फेब्रुवारी,कोडोली 17 फेब्रुवारी, करंजे त सातारा 18 फेब्रुवारी, सातारा 20 फेब्रुवारी व नागठाणे 21 फेब्रुवारी.
संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे. कोर्ट फी स्टँप लावून अर्ज करावा. तलाठी यांचा रहिवास व उत्पन्न दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्न दाखला (उत्पन्न मर्यादा 21000/- (एकविस हजार रुपये) व दिव्यांगासाठी 50000/- (पन्नास हजार रुपये पर्यंत ) रेशनकार्ड झेरॉक्त प्रत, विधवा असल्यास पतीच्या मृत्युचा दाखला सत्यप्रत, दिव्यांग प्रमाणपत्र सत्यप्रत, परितक्त्या असल्याबाबत ग्रामविकास अधिकारी (तलाठी) व ग्रामसेवक ग्रामीण भागासाठी व शहरी भागासाठी तलाठी व कर निरीक्षक यांचे संयुक्त प्रमाणपत्र. अनाथ असल्यास ग्रामसेवक व गटविकास अधिकारी / प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला अनाथ असलेबाबत दाखला. वयाचा दाखला. दुर्धर आजार असल्यास सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र. आधारकार्ड झेरॉक्स प्रत. छाननी तक्त्यामधील 1 ते 6 मुद्याबाबतचे प्रतिज्ञापत्र. यासर्व कागदपत्रांसह लाभार्थी यांनी शिबीराच्या ठिकाणी उपस्थित रहावे.