सातारा : घरातून किराणा सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडलेल्या महिलेचा शोध अद्याप लागलेला नसल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रजनी पंकज जाधव (वय ३०) या घरातून बाहेर पडल्यानंतर परत आल्या नाहीत. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही.
याबाबत पती पंकज शंकर जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून विविध माध्यमांतून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून महिला पोलीस हवालदार पाटील या तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत.