राज्य परिवहन महामंडळाची हिरकणी बसचा अपघात

४० विद्यार्थी जखमी

by Team Satara Today | published on : 03 October 2024


वाडा (पालघर) : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची हिरकणी बसचा अपघात झाला आहे. चढाव चढत असताना बस बंद पडली. यात ब्रेक फेल झाल्याने बस उलट्या दिशेने येत पलटी झाली. या अपघातात बसमधील ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पालघर जिल्ह्यातील वाडा आगाराची हिरकणी बस वाडा बसस्थानकातून आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन मार्गस्थ झाली. बस वाड्याहून आमगावच्या दिशेने जात असताना कुमदल गावा जवळील असलेला चढाव चढत असताना बस असताना बंद पडली व मागे येऊ लागली. यावेळी बस चालकाने ब्रेक दाबला असताना ब्रेक फेल झाले होते. यामुळे बस मागे उताराला आल्याने पलटी झाली. या बसमध्ये एकूण ४० विद्यार्थी प्रवास करत होते. हे सर्व विद्यार्थी जखमी झाले आहे. 

पालक वर्ग संतप्त :  सर्व जखमी विद्यार्थ्यांवर वाडा येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात असून भंगार बस असून यामधून विद्यार्थी प्रवास करतात. महामंडळने चांगल्या दर्जाचे बस उपलब्ध करून द्यावे. तसेच बस डेपोतून निघताना बस पुर्णपणे तपासली जाते. मग बसचा ब्रेक फेल झाला कसा? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हायकोर्टाने ताशेरे ओढताच २४ तासांतच अटक
पुढील बातमी
१० तास वाट पाहूनही मुख्यमंत्री शिंदेनी भेट नाकारली!

संबंधित बातम्या