सातारा : ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उध्वस्त केले. या ऑपरेशन सिंदूरचे साताऱ्यात तिरंगा रॅलीच्या माध्यमातून कौतुक करण्यात आले. सातारकर नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणा दिल्या.
भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे आणि सातारकरांच्या मनात असलेली देशाबद्दल व सैन्याबद्दल भावना आणखी सुदृढ करण्यासाठी आज नागरिकांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. राजवाडा येथून मोती चौक मार्गे पंचमुखी गणपती मंदिरापासून पोलीस मुख्यालयाच्या समोरून श्री शिवतीर्थ येथे फटाक्यांचा वर्षाव करून रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर नगरपालिका कार्यालय मार्गे कमानी हौद, देवी चौक येथून राजवाडा येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीमध्ये सातारकर नागरिक उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा होता आणि भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा दिल्या जात होत्या.
यावेळी विकास गोसावी, चिन्मय कुलकर्णी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, अविनाश खर्शीकर, वैशाली टंगसाळे, रीना भणगे, अश्विनी हुबळीकर, रोहिणी क्षीरसागर, गौरी गुरव, रोहित किर्दत, विक्रम बोराटे, चंदन घोडके, अमोल टंगसाळे, दीपक क्षीरसागर, चंद्रकांत माने, विकास बनकर, हर्षल चिकणे, कैलास सुतार, विजय गाढवे, प्रथमेश इनामदार, अनिकेत टिंगरे, नरेंद्र सावंत, तेजस कदम, यश माने, राज पवार, गौरव मोरे, मनोहर वडलिक, श्रीकांत वायदंडे, अभिषेक जगताप, जितेश माने, जय जगताप, निलेश वीर, अभिषेक जाधव, हर्षल जाधव, किरण चोरगे, आकाश मोहिते, सुयश कालेकर, राजवर्धन कदम, तुषार भोंडवे, ओजस वरागडे, राम मोरे, हनुमंतराव जाधव, अवधूत सकटे, हर्षल सोनवणे, जगदीश गायकवाड, प्रणील पाटील, आदित्य गोवेकर, विराज जायकर, ऋतुराज जाधव, धीरज फडतरे, प्रणव शिंगटे, संगमेश्वर पाटील, ऋषिकेश पाटिल, विश्वजीत यादव, बंटी खरे, रोहन राजेशिर्के, किशोर पवार आणि सातारकर नागरिक उपस्थित होते