सातारा : येथील शहर आणि परिसरातील नामवंत लेखक व वाचक यांचा, ‘आम्ही पुस्तक प्रेमी समूह’ आणि दीपलक्ष्मी नागरिक सहकारी पतसंस्था आयोजित लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमात विद्या पोळ-जगताप यांच्या, "बाय गं" या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाविषयी तसेच त्यांच्या या पूर्वीच्या ‘जगणं कळतं तेव्हा’ कादंबरी व ‘देवचाफा’ या काव्यसंग्रहाविषयी गप्पा व संवाद कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृती हॉल येथे शनिवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे.
सदरच्या कार्यक्रमास डॉ.संदीप श्रोत्री, शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, श्रीराम नानल, तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सदर कार्यक्रमाचे संवादक वैदही कुलकर्णी या आहेत.उपक्रम समन्वयक स्वाती राऊत आहेत.
विद्या पोळ-जगताप यांनी सोलापूर मनपा, उपायुक्त पाचगणी व वाई मुख्याधिकारी म्हणून काम केलेले आहे. मुख्याधिकारी असताना शहराचे नावलौकीक राष्ट्रीय पातळीपर्यंत नेणा-या अधिकारी आणि राजहंसी लेखिका म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या लेखन साहित्य विषयी 2018 साली,"जगणं कळतं तेव्हा" ही पहिली कादंबरी राजहंसप्रकाशन कडून प्रकाशित झाली होती.या ग्रंथाला, "मिलिंद संगोराम स्मृती " पुरस्कार मिळाला होता." तसेच त्यांचे शैक्षणिक व अंधश्रद्धा निर्मूलन विषयक वृत्तपत्रे 'लेखन ' आणि अनेक ललित लेख प्रसिद्ध झाले आहेत. 2022 साली "देव चाफा" काव्यसंग्रह 2023 साली "बाय गं" सामाजिक कादंबरी प्रसिद्ध झाली. अशा प्रसिद्ध लेखिका " विद्या पोळ" यांच्या "बाय गं " या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाविषयी गप्पा व संवाद कार्यक्रमास सर्व साहित्य प्रेमींनी यावे. असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचे प्रमुख डॉ.संदीप श्रोत्री व दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.