कत्तलीसाठी जाणार्‍या 53 जनावरांची सुटका

by Team Satara Today | published on : 07 June 2025


कराड : कंटेनर ट्रकमध्ये नियमापेक्षा अधिक जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या कंटेनरला कोल्हापूर नाका येथे अडवून ताब्यात घेण्यात आले. यामध्ये सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची 53 जनावरे होती. याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार संग्राम पाटील यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बिलाल आयुब खान वय 30 व तालिम इसा खान वय 25 दोघेही रा. रा. रिथट ता. नघीना, जि. नुह्यात, राज्य हरियाणा अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. माहिती अशी, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो. नि. अशोक भापकर यांना कत्तलीसाठी जनावरांची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या सुचनेनंतर पोलिसांनी कंटेकर अडवला. त्यावेळी सुमारे सव्वा लाख रूपये किमतीची 53 जनावरे कत्तलीसाठी घेऊन निघाल्याचे आढळूले. याबाबत शहर पोलिसात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..!
पुढील बातमी
तासिका तत्वावर शिक्षक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संबंधित बातम्या