वंचित घटकांना समाजाच्या प्रवाहात आणणार

आ. मनोजदादा घोरपडे यांची ग्वाही

by Team Satara Today | published on : 01 September 2025


सातारा : कराड उत्तरमध्ये भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, हा समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जास्तीत जास्त काम करणार आहे, अशी ग्वाही आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. 

उंब्रज ता. कराड येथे आ. मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, पुरवठा अधिकारी नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, बाळासाहेब साळुंखे चोरेकर, महेशबाबा जाधव, उंब्रजचे सरपंच योगराज जाधव हेही उपस्थित होते.

आ. मनोजदादा घोरपडे म्हणाले, आजपर्यंत तांडावस्तीसाठी जवळपास चार कोटीचा निधी उपलब्ध झाला असून येणार्‍या कालावधीमध्ये सर्व तांडा वस्तीची सुधारणा करणार आहे. तसेच भटक्या विमुक्त समाजातील लोकांना अन्नधान्य उपलब्ध करण्यासाठी सर्वांना शिधा पत्रिका उपलब्ध करून देणार आहे. कोर्टी येथील गोपाळ समाजासाठी हायवे पासून चांगला रस्ता व अंतर्गत सुविधा देण्यासाठी प्रस्ताव केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.

यावेळी जयवंत जाधव (चेअरमन), जयवंत जाधव (संचालक), विनायक जाधव, दिगंबर भिसे पाटील, विलास आटोळे, राजू चव्हाण, बाळासाहेब शिंदे सरकार, सुनिल जाधव, अनिल माने, योगराज सरकाळे, प्रतिभा कांबळे व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्या भटक्या विमुक्त समाज बांधवांकडे जातीचे दाखले नाहीत त्या सर्वांना नवीन जातीचे दाखले उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आ. मनोजदादा घोरपडे यांनी दिली. प्रारंभी भटके विमुक्त समाजातील 22 कुटुंबांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नातून कराड उत्तरमध्ये प्रथम भटके विमुक्त समाजातील लोकांना मोफत शिधा वाटप करण्यात आले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीरा येथे लक्ष्‍मण हाकेंना धक्‍काबुक्‍की
पुढील बातमी
फलटण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील शाळांची शिक्षण परिषद उत्साहात

संबंधित बातम्या