साताऱ्यातील वाढत्या अतिक्रमणांचे नगराध्यक्षांकडे गाऱ्हाणे; सतर्क सातारकरांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट :अतिक्रमण हटावचे धोरण ठरणार

by Team Satara Today | published on : 02 February 2026


सातारा  : सातारा शहर उपनगरी आणि वरदळीच्या रस्त्यांवरील वाढत्या टपऱ्या सध्या चिंतेचा विषय बनल्या आहेत. या टपऱ्या हटवून सातारा शहराची वाहतूक व्यवस्था मोकळी करावी आणि टपऱ्यांचे अर्थकारण मोडून काढावे अशी कळकळीची विनंती सोमवारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे सादर झाली. साताऱ्यातील उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते कन्हैयालाल राजपुरोहित आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळाने ही विनंती बालिका प्रशासनाला केली .हॉकर्स पुनर्वसनाचे आणि अतिक्रमण हटावचे निश्चित धोरण राबवण्यात येईल मात्र त्यासाठी प्रशासनाला थोडासा वेळ द्यावा अशी विनंती नगराध्यक्षांनी यावेळी केली.

सातारा शहरातील विशेषता वरदळीचे रस्ते राजपथ, राधिका रोड,तसेच उपनगरांकडून साताऱ्याला जोडणारे रस्ते शहरातल्या मोकळ्या जागा येथे दिवसागणिक टपऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेच्या अडचणी वाढू लागले असून अपघाताचा धोका वाढला आहे. भविष्यात सातारा शहर टपऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाईल अशी भीती या जेष्ठ नागरिकांच्या शिष्ट मंडळांनी नगराध्यक्षांकडे व्यक्त केली .याशिष्ट मंडळांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते त्यांच्या दालनात भेट घेऊन या संदर्भामध्ये चर्चा केली. 

तत्पूर्वी गेंडामाळ नाका परिसरातील नागरिक सुद्धा अतिक्रमणाचाच मुद्दा घेऊन नगराध्यक्षांच्या दालनात आले होते.  त्यांनी सुद्धा गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक यादरम्यानची अतिक्रमणे वाहतुकीला अडथळा ठरत असून याबाबत अतिक्रमण हटाव पथकाने तात्काळ येथील अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी केली होती. 

या बैठकीमध्ये नगराध्यक्ष अमोल मोहिते अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक श्रीकांत गोडसे वाहतूक विभागाचे सहाय्यक निरीक्षक अभिजीत यादव यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्षांनी सर्व नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत हॉकर्स झोन आणि अतिक्रमण हटाव यासंदर्भात सातारा नगरपालिका निश्चित धोरण ठरवत आहे .जितक्या हॉकर्स ची नोंद पालिका प्रशासनाकडे आहे त्यांना शहरातील सात हॉकर्स झोनमध्ये सुविधांसह स्थानांतरित करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी प्रशासनाला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत काळजी करू नये, असे आश्वासन नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी दिले.

टपऱ्यांच्या आडून चालणाऱ्या अर्थकारणाचे काय ?

सातारा पालिकेचे प्रशासन राजकीय दबाव आणि हॉकर्स संघटनांचा अडील तट्टू पणा यामध्ये विनाकारण भरडले जाते .तसेच नगरपालिकेच्या जागेमध्ये तथाकथित स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या आश्रयाने भलतेच बोके टपऱ्यांचे भाडे लाटून गब्बर होऊन जातात .ही अभद्र परंपरा सातारा नगरपालिकेला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने मोडून काढावी लागणार आहे .यासाठी अमुकतमुक नगरसेवकांचे येणारे राजकीय फोन बिनधास्तपणे फाट्यावर मारावे लागतील .शहराच्या सौंदर्याचे आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेचे धोरण ठरताना उभे केला जाणारा राजकीय बागलबुवा आणि होकर्स वाल्यांच्या रोजी रोटी चा केला जाणारा भावनिक प्रश्न हा प्रशासनाच्या काळजीचा विषय आहे .हॉकर्स म्हणजे विक्रेत्यांच्या रोजी रोटी ला निश्चित प्राधान्य मिळायला पाहिजे याविषयी दुमत नाही मात्र त्या आडोशाने जर पालिकेच्या जागेत कोण फुकट चंबू बाबुराव आपली खळी भरणार असेल तर ते चालणार नाही असा खमका इशारा पालिका प्रशासनाला द्यावा लागेल


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नटखट करंडक बालनाट्य स्पर्धेमध्ये अभिरुची कोल्हापूर संस्थेचे 'ठोंब्या'ने बाजी मारली
पुढील बातमी
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकत्रिकरणाच्या तर्कवितर्कांना दिला पूर्णविराम; राष्ट्रवादी ‘एनडीए’सोबत सत्तेतच राहणार

संबंधित बातम्या