संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चौथ्या दिवशीही लोकसभा-राज्यसभा ठप्प; विरोधक राजीनाम्यावर ठाम

by Team Satara Today | published on : 23 July 2026


दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशनापूर्वी घडलेल्या घटनांमुळे सलग चार दिवस झाले तरीही काहीही कामकाज होऊ शकलेले नाही. २० जुलैपासून अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, गुरूवारीही कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. 

सलग चौथ्या दिवशी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक दिसले. सरकारने आधी प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, त्यानंतरच चर्चा करून अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. तर विरोधक अटींसह चर्चा करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. राजीनाम्याच्या मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने कोंडी कायम आहे.   


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजकारण करू नका. मोदी सरकार दोषींना सोडणार नाही - उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, दरे तर्फ तांब येथे पत्रकारांशी संवाद
पुढील बातमी
महिला आंदोलकावर हात उचलणाऱ्या अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांना दणका; आंदोलनावरील कारवाईविरोधात दाखल याचिकांची दखल

संबंधित बातम्या