सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्यात बेवारस स्थितीत पडून असलेल्या एकुण ३७ दुचाकी वाहनांचा शासन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांबाबत अद्यापपर्यंत कोणीही मालकी हक्क सिध्द केलेला नाही.
ही वाहने उपलब्ध माहितीप्रमाणे कोणाची असल्यास मूळ कागदपत्रांसह सातारा शहर पोलीस ठाणे येथून ३० सप्टेंबरपूर्वी घेऊन जावीत. त्यानंतर कोणीही या बेवारस वाहनांबाबत हक्क सांगीतल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व नमूद वाहनांचा स्क्रॅप म्हणून शासन नियमांप्रमाणे लिलाव केला जाईल. तरी संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत सातारा शहर पोलीस ठाणे, सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी केले आहे.
बेवारस वाहने मालकांनी घेऊन जाण्याबाबत आवाहन
by Team Satara Today | published on : 09 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा