सातारा : छ.शिव,शाहू,फुले व आंबेडकर यांचा असणारा महाराष्ट्र सन २०१४ पासून पुरोगामी राहिलाय कुठे ? असा खडा सवाल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे करण्यात आला.
येथील छ.प्रतापसिंह हायस्कुलच्या प्रांगणात पुरोगामी विचारधारा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे, प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे व जिल्हाध्यक्ष रावण तथा हृषीकेश गायकवाड यांनी बोलताना वरील दावा केला. माजी न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील उद्घाटक म्हणून आले होते.मात्र,ते लवकर गेल्याने बंधुत्व साहित्यरत्न डॉ.शरद गायकवाड यांनी आयत्यावेळी उद्घाटन केले.
प्रा.सुकुमार कांबळे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले,"राजांची जयंती-स्मृतिदिन फक्त बहुजन समाज करतो. सत्ताधारी पक्ष २०२० साली हिंदुराष्ट्र करणार होते. आता २०३५ पर्यंत मुदत वाढवली आहे.तेव्हा पुरोगामीत्व महाराष्ट्रात होते,आहे व राहणार आहे.सर्व स्तरांवर विरोधक सातत्याने प्रयत्नशील आहेत. म्हणुनच आम्ही डेमोक्रॅटिक पक्षातर्फे संघटन वाढवणार आहे.आम्हाला एक महामंडळ/आमदार/मंत्री नको.एकूण सत्ताच पाहिजे. कारण,आम्ही बुद्ध विचारांची औलाद असून शस्त्रधारीही आहोत."असे एआहत करीत ऐतिहासिक अनेक दाखले प्रा.कांबळे यांनी दिले.
स्वागताध्यक्ष असलेले राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे म्हणाले,"सताधारी यांनी कम्युनिष्ट चळवळ मोडीत काढलेली आहे.तेव्हा आपली माणसं जोपासली पाहिजे.राज्य शिव,फुले,शाहू व आंबेडकर विचारधारेवर आहे.विरोधक कर्मचारी वर्गांमध्ये बुद्धी भेद करीत आहे.बाबासाहेब वाचले पाहिजे.समाजामध्ये असणारी अंधश्रध्दा, व्यसनाधीनता,परंपरा आदी नष्ट केल्या पाहिजेत. आपले मित्र व शत्रू कोण आहेत ? हे ओळखले पाहिजे.मनुष्य जन्मापेक्षा विचारधारेवर घडत असतो. लोकसभेचे विरोधीपक्षनेते खा.राहुल गांधी युवराज व गांधीवादी विचार धारेतील आहेत.मात्र,त्यांना हातात संविधान घ्यावे लागत आहे.तेव्हा पक्ष वाचवायचा असेल तर पुरोगामीत्वाशीवाय पर्याय नाही."
डॉ.शरद गायकवाड म्हणाले, "बुद्धांचा विहार असताना बिहार केला आहे. सध्या लोकशाही कोमात दहशतवाद जोमात आहे.छ.शाहू महाराजानी २३ वस्तीगृहांची निर्मिती करून संस्थानमध्ये बहुजनसमाजास शिक्षणाची सोय केली.बुद्ध यांच्यानंतर छ.शाहू महाराज हे राजर्षी झाले. तेव्हा समाजाने बुद्ध-आंबेडकर विचार आत्मसात करावेत.जागृत होऊन पंचशिलेचे झेंडे घराघरावर लावावेत."
जिल्हाध्यक्ष रावण तथा हृषीकेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.बंधुत्व साहित्यरत्न प्रकाश काशीळकर यांनी आभार मानले.बंधुत्व शाहिररत्न मानांकन मिळविणारे शाहिर भानुदास गायकवाड व सहकारी यांनी गाणी सादर केली.अमर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रथमतः छ. शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.सदरच्या सभेस पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनेचे प्रतिनिधी,नागरिक व महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.