सातारा : हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने सर्वत्र जीआरची होळी करण्यात आली. सातारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवतीर्थ पोवई नाका येथे रविवारी दुपारी जीआरची भरपावसात होळी करत महायुतीचा निषेध करण्यात आला.
शालेय शिक्षण विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी अस्मितेचा धोका निर्माण होत आहे. त्याच्या निषेर्धात शिवसेना ठाकरे गटाकडून पोवई नाका येथे हिंदी भाषेच्या निर्णयाच्या शासन आदेशाची जीआरची करत निषेध व्यक्त केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे म्हणाले, सातारा हा पत्री सरकारचा, क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. महायुती सरकार हि खोटारडे सरकार आहे. त्यांनी काढलेला जीआरची होळी करण्यात आली आहे. यापुढेही महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच दि. 5 तारखेला होणार्या मुंबईतील मोर्चाला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनेत्या छाया शिंदे, शेतकरी जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, विश्वनाथ धनवडे, सुनील पवार, संतोष जाधव, प्रणव सावंत, सागर धोत्रे, अमृता पाटील, सलमा शेख, बाळासाहेब शिंदे, रवींद्र भणगे, गणेश अहिवळे आदी उपस्थित होते.